Friday, September 25, 2009

पेग

सबंध काय म्हणता राव, अर्धी फार झाली

चला उठा आवरा आता, गर्दी फार झाली

नोकरी, बिझनेस आणि इलेक्शन सुध्दा झाली

आपण उस्ताद कधी होणार, शागिर्दी फार झाली

निष्ठा, बायको आणि इस्टेट, दोन दोन प्रत्येकी

दोन्ही कशा व्हाईटला ठेवू, एखादी फार झाली

उद्योग करुन इतके जरी भिजलो पैशाच्या पावसात

झोप तेवढी येत नाही हो, सर्दी फार झाली

वर स्वर्गात पुण्य पाहिजे, नायतर तिकडे जागा नाय

जास्त काय करायला नको, आर्ती फार झाली..

बास हो बास….

बेवड्या देवाची दुनिया बुडणार, वर्दी फार झाली

चला उठा आवरा आता, गर्दी फार झाली..

No comments:

Post a Comment