Friday, September 25, 2009

कळतय मला हे बर नाही...

मन भरून येन, अस सतत झुरन
डोळ्या पानी येन, अस नेहमीच होण
कळतय मला हे बर नाही...

किती दिवस अस उदास राहणार
स्वताचे सुख दुसरयात शोध नार
कोणाची तरी वाट पाहणार..
त्या वाटे वर तर काहीच चाहुल नाही..

हसता हसता मधेच थांब ने
सगळ्यात असून एक्ट वाटने
सततची ही आठवण येणे..
ज्याच्या साठी झुराव त्याला तर
कश्याचाच पत्ता नाही..

का म्हणून कुणाची अशी वाट बघाव,
का कुणासाठी अस सतत झुराव
आपल मन तरी आपल्या ताब्यात असाव...
कुणाच्या असण्याचे ते बांधील नाही...

ठरवून हव तर मनसोक्त हसाव ...
नाहीच जमल तर भरपूर रडून घ्याव्..
कोणाशी तरी मनसोक्त बोलाव..
नसेल कोणी तर लिहित बसाव..
मग मात्र
दुःखाचे गाठोडे घट्ट बान्धाव..
दूर पाण्यात फिरकाउन दयाव..
की पुन्हा ते परत येणारच नाही..

अजूनही पुढे किती वाटा आहेत..
जग न्यासाठी नविन कारण आहेत..
आजुबाजुला बघा किती मानस आहेत...
आपल्याला जपणारी नाती आहेत..
आपल्याला जीव लावान्यारानहुन
मोलाच या जगात कोणीच नाही..

No comments:

Post a Comment