Sunday, March 14, 2010

सुविचार

- पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
- दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
- त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
- युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
- जगात काही अजरामर नाही- तुमच्या चिंतासुध्दा!
- जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
- आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
- सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
- माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
- दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुस-याला प्रजलीत करते.
- आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
- सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
- उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
- जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
- संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
- ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
- शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
- कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
- मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
- अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आह

No comments:

Post a Comment